Vayoshri Yojana Benefits: वयोश्री योजना म्हणजे काय? व फायदे, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Vayoshri Yojana Benefits: वयोश्री योजनाच्या माध्यमातून महाराष्ट्रामधील वरिष्ठ नागरिकांना त्यांच्या उतार वयामध्ये कोणत्याही प्रकारच्या आर्थिक अडचणी न होण्यासाठी काही रक्कम दिली जाते. आता ती रक्कम किती दिली जाते? आणि कोणकोणते फायदे यामधून वरिष्ठ नागरिकांना मिळतात? यासाठी संपूर्ण आर्टिकल पहा.

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

आपल्या देशामध्ये महागाई आणि राहणीमान खूप बदलत चालले आहे. यामध्ये देशभरातील लहान मुलांपासून ते वरिष्ठ नागरिकांपर्यंत सर्व लोक सफर करत आहेत. त्यामध्ये काही लोकांच्या घरामध्ये आर्थिक परिस्थिती फारच गंभीर असते, यामुळे उतार वयामध्ये वरिष्ठांना विविध प्रकारच्या सामाजिक व आरोग्य विषयक समस्यांना सामोरे जावे लागते. 

त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्रामध्ये 15% पेक्षा जास्त प्रमाण असलेले वरिष्ठ नागरिक दुसऱ्यांवरती अवलंबून आहे. यामध्ये भारताची सरासरी ही 10% आहे, ज्याच्या तुलनेत महाराष्ट्र राज्याचे प्रमाण जास्त आहे. या प्रमाणाला कमी करण्यासाठी व वरिष्ठ नागरिकांना सामाजिक व आरोग्य विषयक मदत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने वयोश्री योजना आणली आहे.

महाराष्ट्र सरकारने राज्यातील वरिष्ठ नागरिकांना आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी वयोश्री योजनाची सुरुवात 05 फेब्रुवारी, 2024 मध्ये केली. या योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत लाभार्थ्यांना पाठविण्यासाठी सरकारने 480 कोटी रुपयांचा अर्थ संकल्प सुद्धा सादर केला आहे. 

ज्यामध्ये योजनेच्या माध्यमातून वरिष्ठ नागरिकांच्या बँक खात्यामध्ये वर्षाला 3,000 रुपयांची रक्कम थेट डीबीटीद्वारे ट्रान्सफर केली जाते. ज्यामधून जेष्ठ नागरिक चष्मा, सवाईकल कॉलर, नी-ब्रेस, कमोड खुर्ची, लंबर बेल्ट, स्टील व्हील चेअर, श्रवण यंत्र, फोल्डिंग वोकर आणि लंबर बेल्ट यांसारखे उपकरणे विकत घेण्यासाठी फायदा करून घेऊ शकतात. 

महाराष्ट्र राज्य सरकारने योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत दीड लाखांपेक्षा जास्त ज्येष्ठ लाभार्थ्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून दिली आहे. तसेच योजनेमध्ये अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना शासनाकडून मनशक्ती, योगोपचार, प्रशिक्षण यांसारख्या केंद्रामध्ये सहभागी करून त्यांना मदत केली जाते.

Read More: