Antyodaya Anna Yojana Ration Card Benefits and Eligibility: अंत्योदय शिधापत्रिका म्हणजे काय? त्याचे फायदे व पात्रता, घ्या जाणून 

Antyodaya Anna Yojana Ration Card Benefits and Eligibility: आपल्या आजच्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत, अंत्योदय शिधापत्रिका काय? व त्यामधून कोणकोणते फायदे दिले जातात? आणि योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो?

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

अंत्योदय राशनकार्डला AAY Card सुद्धा म्हटले जाते, ज्याचा पूर्ण अर्थ अंत्योदय अन्न योजना असा होतो. National Food Security Act, 2013 अंतर्गत भारत देशामधील गरीब वर्गातील कुटुंबाना अन्नधान्य मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे AAY योजनेची सुरुवात 25 डिसेंबर, 2000 रोजी केली होती. 

सुरुवातीच्या काळामध्ये केंद्र सरकारने जवळपास 10 लाखांपेक्षा जास्त कुटुंबाला योजनेमध्ये सहभागी करून घेतले होते. ज्यामध्ये केंद्र सरकारचा मुख्य उद्देश हा भारत देशामधील गरिबी रेषेखालील कुटुंबाना अन्न पुरवठा उपलब्द करू त्यांना सुरक्षा प्रदान करणे आहे. 

  • योजनेमध्ये पात्र असलेल्या लाभार्थ्यांना AAY राशनकार्ड दिले जाते. 
  • ज्याच्या माध्यमातून लाभार्थी प्रत्येक महिन्याला 35 किलो अन्नधान्य एकदम कमी किमतीमध्ये घेऊ शकतो. 
  • ज्यामध्ये प्रतिमाह 20 किलो तांदूळ आणि 15 किलो गहू घेऊ शकतो. 
  • योजनेमध्ये सहभागी असलेल्या लाभार्थ्यांना तांदूळ 3 रुपये किलो आणि गहू 2 रुपये किलो या किमतींमध्ये दिले जाते. 
  • भारत देशामधील गरिबी रेषेखाली असलेले कुटुंब योजनेमध्ये अर्ज करण्यास पात्र आहेत. 
  • योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 15,000 रुपयांच्या खाली असणे. 
  • देशामधील 60 वर्षावरील जेष्ठ नागरिक ज्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत नाही. 
  • देशभरातील स्वतःची जमीन नसलेले शेतकरी कुटुंब अर्ज करू शकतात. 
  • त्याचप्रमाणे दिव्यांग आणि विधवा महिला सुद्धा योजेनचा लाभ घेऊ शकतात. 
  • देशातील आदिवासी कुटुंब व कातकरी वर्ग पात्र आहेत. 
  • कुंभार, चांभार, सुतार, हमाल, विणकर आणि मोची हे देखील योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात.

हे वाचा: