Jal Jeevan Mission Yojana 2024: केंद्र सरकारने देशभरातील पाण्याचे समस्या दूर करण्यासाठी जल जीवन मिशन योजना (JJM) सुरु केली होती. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे लक्ष्य योजनेच्या माध्यमातून देशभरातील नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पाणी प्रत्येकांच्या घरघरांमध्ये उपलब्ध करून देणे आहे.
पाणी हे विषय आपल्या सगळ्यांसोबत जुडलेले आहे. पाणी तीन गोष्टींमधून तयार होते, ते म्हणजे ग्लेशियर विरघळून, समुद्राच्या वाफेतून आणि नैसर्गिकरित्या पडणाऱ्या पावसमधून. पूर्ण विश्वामध्ये जवळपास 97% पाणी महासागरांमध्ये आहे आणि फक्त 3% पिण्यासारखे पाणी उपलब्ध आहे. सर्व विश्वभरामध्ये पाण्याची समस्या वाढत चाली आहे.
या समस्यांना कमी करण्यासाठी केंद्र सरकारने जल जीवन मिशन या उपक्रमाची सुरुवात केली आहे आणि आज आपल्या लेखामधून याच विषयावर संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. ज्यामध्ये योजना काय आहे? त्यामध्ये कोणकोणते फायदे आहेत? त्यांचे मुख्य उद्देश काय आहेत? नागरिक कशाप्रकारे फायदा घेऊ शकतो? नागरिकांना अर्ज करण्यासाठी काय करावे लागेल? आणि कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे? तर लेख शेवटपर्यंत पहा.
Jal Jeevan Mission Yojana in Marathi
केंद्र सरकारने जल जीवन मिशन योजनाची सुरवात 15 ऑगस्ट, 2019 रोजी Ministry of Jal Shakti अंतर्गत केली होती. यामध्ये योजनाचे मुख्य उद्देश 2024 पर्यंत ग्रामीण क्षेत्रातील प्रत्येक घरांमध्ये घरगुती पाण्याचे नळ कनेक्शन जोडणे आहे. तसे ही योजना संपूर्ण भारत देशामध्ये राबविण्यात येते, ज्यामध्ये शहरी व ग्रामीण या दोन्ही भागांचा समावेश आहे.
शहरी भागांमध्ये जवळजवळ पाण्याच्या कनेक्शनची सुविधा उपलब्ध आहेत, परंतु देशामधील काही ग्रामीण भागांमध्ये अजूनही पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने केंद्र सरकारचे पूर्ण लक्ष त्या क्षेत्रांमध्ये आहे. या योजनेच्या माध्यमातून घरांमध्ये जास्त प्रमाणात व स्वच्छ सुरक्षित पाणी पुरविले जाते.
पाणी स्वच्छ आहे की नाही याची पूर्ण तपासणी Asha Group व Self Help Group करते. यामध्ये जवळपास 50% महिलांचा समावेश आहे. याना केंद्र सरकारच्या माध्यमातून पाण्याची गुणवत्ता तापसण्यासाठी स्पेशल किट दिले जाते. यामध्ये ग्रामीण क्षेत्रातील नागरिकांना पाण्याचे भरावे लागणारे बिल खर्च सुद्धा कमी करण्यात येते.
Jal Jeevan Mission 2024 Overview
योजनाचे नाव | जल जीवन मिशन योजना (JJM) |
श्रेणी | केंद्र सरकारी योजना |
सुरु झाली | 15 ऑगस्ट, 2019 दरम्यान |
कोणी सुरु केली | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी |
विभाग | जल शक्ती मंत्रालय, भारत सरकार |
उद्देश | देशभरातील घरांमध्ये स्वच्छ व सुरक्षित पाण्याचे कनेक्शन करून देणे |
लाभार्थी | भारत देशामधील नागरिक |
अर्ज प्रकिया | ऑनलाइन |
अधिकृत वेबसाइट | jaljeevanmission.gov.in |
Jal Jeevan Mission Yojana Objectives
केंद्र सरकारचे जल जीवन मिशन योजनाचे मुख्य उद्देश भारत देशामधील ठिकठिकाणी स्वच्छ पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे आहे. जेणेकरून दुर्बळ अवस्थेत राहणाऱ्या कुटुंबातील नागरिकांचे आरोग्य चांगले होईल आणि त्यांना कमी खर्चामध्ये स्वच्छ पाण्याची कनेक्शन प्राप्त होईल.
आपल्या देशामध्ये काही भागांमध्ये आजही पाण्याची सोया नसल्यामुळे कुटूंबातील महिला नदी पात्रावर, तलावामध्ये, विहिरीमध्ये आणि एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पाणी घेण्यास जातात. यामुळे त्यांच्या हेल्थला समस्या निर्माण होते. तसेच स्वच्छ पाणी नसल्यामुळे विविध रोगांच्या सामोरे जावे लागते.
अशाच सर्व महिलांना घरगुती पाण्याचे नळ कनेक्शन लावून देण्याचे काम सरकार या योजनेच्या माध्यमातून करत आहेत.
Jal Jeevan Mission Yojana Benefits
- जल जीवन मिशन योजनाचे फायदे देशभरातील कुटुंबाना दिला जातो, ज्यामध्ये ग्रामीण व शहरी क्षेत्रांचे समावेश आहे.
- केंद्र सरकारतर्फे 2023-24 च्या अर्थसंकल्पनेत 70 हजार कोटी रुपयांचा बजेट JJM योजनेसाठी सादर करण्यात आला होता.
- ही योजना सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम असल्यामुळे यामध्ये 50:50 आर्थिक खर्च केंद्र व राज्य सरकार मिळून करते.
- या योजनेच्या माध्यमातून घरोघरी पाण्याचे नळ कनेक्शन उपलब्ध करून दिले जाते.
- त्याचसोबत नागरिकांच्या आरोग्यावर लक्ष देत स्वच्छ व सुरक्षित पाण्याची सुविधा दिली जाते.
- ग्रामीण भागातील कुटुंबामध्ये एका माणसाच्या प्रमाणे 55 लीटर पाणी एका दिवसाला वापरायला देतात. यामध्ये कुटुंबातील एकूण सदस्य व 55 लीटरचे गुणाकार करून येणाऱ्या प्रमाणानुसार पाणी वाटप केले जाते.
- ग्रामीण क्षेत्रामधील कुटुंबाना Functional Household Tap Connections (FHTC) च्यामार्फत 2024 पर्यंत पाण्याचे कनेक्शन पोहचवले जातील.
- पाण्याची मागणी व पुरवठा हे स्थानिक पातळीवर केले जाते, यामध्ये जास्त प्रमाणात असतील तर योजनेच्या माध्यमातून ग्रे वॉटरचे व्यवस्थापन पर्यायी केले जाते.
- जन आंदोलनाच्या माध्यमातून नागरिकांना माहिती व शिक्षण दिले जाते, त्याचसोबत त्यांच्यासोबत सवांदसुद्धा साधला जाते हे योजनेचे मुख्य घटक आहेत.
- ग्रामीण भागातील गावांमध्ये पायाभूत सुविधा उपलब्थ करण्यासाठी समुदायांना 5% किंवा 10% खर्चाचे योगदान द्यावे लागते. जर आर्थिक अडचण असल्यास ते कामगार म्हणून सुद्धा काम करू शकतात.
- योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 12 कोटी पाण्याचे नळ कनेक्शन करण्यात केंद्र सरकार यशस्वी राहिले आहेत.
- WHO रिपोर्टच्या माहितीनुसार JJM योजनेच्या अंतर्गत डायरियामुळे 4 लाख नागरिकांचे जीव वाचविण्यात मदत झालेली आहे. त्याचे कारण स्वच्छ पाण्याच्या पुरवठा आहे.
- देशभरामध्ये जवळपास 62.84% लोकांपर्यंत टॅप वॉटर कनेक्शन करण्यात आलेले आहेत.
- केंद्र सरकारच्या माध्यमातून हर घर नलसे जल ही घोषणा गावागावांमध्ये केली जाते.
- त्याचप्रमाणे ग्रामीण क्षेत्रांमध्ये पाण्याची टाकी बसवली जाते, ज्याचे कार्यकाळ 30 वर्षांचा असतो.
- 30 वर्षानंतर पाण्याच्या टाक्यांची दुरुस्ती करण्यात येते आणि त्याचे काम ग्रामपंचायत व पंचायत बघते.
- ज्या गावांमध्ये JJM अंतर्गत काम सुरु केले जाते, तेथील 5 महिलांना पाण्याची तपासणी व इतर कामांसाठी सहभागी केले जाते.
- त्याचप्रमाणे गावातील एका व्यक्तीला पाण्याच्या टाकीची दुरुस्ती व इतर कामासाठी त्यांच्या इच्छेनुसार सहभागी केले जाते.
- नेमलेल्या व्यक्तीला PM Kaushal Vikas Yojana (PMKVY) किंवा Rural Self Employment Training Institutes (RSETI) अंतर्गत प्रशिक्षण दिले जाते.
- या कामासाठी महिलांना व पुरुषांना वेतन स्वरूपात 6000 ते 8000 रुपये पगार सुद्धा दिले जातो.
Jal Jeevan Mission Institutional Arrangement
- योजनेचे राष्ट्रीय पातळीवर National Jal Jeevan Mission (NJJM) काम सांभाळते.
- देशातील प्रत्येक राज्यांमध्ये State Water and Sanitation Mission (SWSM) योजनेचे अंमलबजावणी करते.
- प्रत्येक जिल्ह्यांमध्ये District Water and Sanitation Mission (DWSM) योजनेचे कार्य सांभाळत असते.
- गावांमध्ये काम करण्यासाठी Village Water Sanitation Committee (VWSC) विभाग काम करते आणि यामध्ये आशा व सेल्फ हेल्प ग्रुपचे जवळपास 50% महिला काम करत असतात.
Jal Jeevan Mission Yojana Eligibility
जल जीवन मिशन योजनामध्ये भरती होण्यासाठी नागरिकांना पात्र असणे आवश्यक आहे, त्यासाठी खालीलपैकी पात्रतेच्या अटी सांगितल्या आहेत.
- भर्तीमध्ये सहभागी होणार नागरिक भारताचा स्थानिक रहिवासी असला पाहिजे.
- त्या अर्जदार नागरिकाचे शिक्षण 10 वी आणि 12 वी पूर्ण झालेले असणे.
- योजने अंतर्गत सहभागी होणाऱ्या नागरिकांचे वय 18 ते 40 वर्षाच्या खाली असणे.
- ज्या गावांमध्ये योजना राबविली जात आहे, त्याच गावातील सदस्य अर्ज करण्यासाठी पात्र असणार.
- भर्तीसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे संपूर्ण कागदपत्रे असणे आवश्यक आहेत.
Jal Jeevan Mission Yojana Required Documents
जल जीवन मिशन भर्तीमध्ये आवश्यक असणारी कागदपत्रे नागरिकांकडे असणे, यासाठी खालीलप्रमाणे कागदपत्रांची यादी दिली आहे.
- अर्जदार व्यक्तीचे आधारकार्ड
- मुळचा स्थानिक रहिवासी प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
- शैक्षणिक पुरावा (10 वी व 12 वी चे मार्कशीट)
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- बँक खात्याची माहिती (पासबुक)
- ई-मेल आयडी
- अर्जदाराचे पॅनकार्ड
Jal Jeevan Mission Yojana Registration
जे नागरिक जल जीवन मिशन योजनामध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांनी खालील दिलेल्या प्रकियांना स्टेप बाय स्टेप फॉलो करणे.
- तुम्हाला सर्वात प्रथम जल जीवन मिशनची अधिकृत वेबसाइट उघडावी लागेल.
- त्यानंतर तुमच्या समोर JJM चा डॅशबोर्ड स्क्रीनवर उघडेल.
- डॅशबोर्डमध्ये तुम्हाला Apply Online या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर त्यामध्ये अर्जाचा संपूर्ण फॉर्म उघडून येईल.
- त्या फॉर्ममध्ये JJM संबंधित जी काही माहिती विचारली असेल ती भरून घेणे.
- माहिती भरल्यावर आवश्यक कागदपत्रांची PDF तयार करून पोर्टलवर अपलोड करणे.
- फाईल अपलोड केल्यावर सबमिट बटणाचा पर्याय दिसेल तो क्लिक करणे.
- अशा पद्धतीने भर्तीसाठी अर्ज यशस्वीपणे पूर्ण होईल.
- त्यानंतर नेमलेल्या अधिकाऱ्यांकडून तुमचे अर्ज तपासले जातील.
- तुम्ही भर्तीसाठी योग्य असाल तर तुम्हाला निवडले जातील.
Jal Jeevan Mission Yojana List Check Process
- जल जीवन मिशन योजनाची यादी पाहण्यासाठी सुरवातीला अधिकृत वेबसाइटमध्ये जावे लागेल.
- त्यानंतर तुमच्या समोर डॅशबोड उघडेल, त्यामध्ये Village अशा पर्यायावर क्लिक करा.
- त्यामध्ये तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा, ब्लॉक, तुमची पंचायत व गावाचे नाव निवडायचे.
- संपूर्ण पर्याय निवडून झाल्यावर Show यावर क्लिक करा.
- क्लिक केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर Profile View ऑपशनला निवडा.
- निवडल्यावरती त्यामध्ये वॉटर टेस्टिंग फील्डमधील महिला ट्रेनर व व्यक्तींचे नावे दिसतील.
- फक्त जर गावासाठी लागू असेल, तर ऑपेरेशन आणि मेन्टेनन्समध्ये तुमचे नाव दिसेल.
- अशा पद्धतीने योजने संबंधित संपूर्ण यादी उघडून येईल आणि तुम्ही नाव तपासू शकता.
निष्कर्ष
आमच्या लेखामधून तुम्हाला Jal Jeevan Mission Yojana बद्दलचे संपूर्ण माहिती मार्गदर्शन केले. यामध्ये योजनेची सुरुवात कुठून झाली? कोणामुळे झाली? त्यामध्ये कोणत्या विभागाचा समावेश आहे? कोण या योजनेची अंमलबजावणी करत आहेत? कोणत्या तारखेला सुरु केली? यामध्ये कोण लाभार्थी असणार आहेत? कोणते भागात जास्त लक्ष दिले जाते? भर्तीसाठी कोण पात्र असणार? त्यामध्ये अर्ज करताना कोणते कागदपत्रे द्यावी लागणार? नागरिक कशा पद्धतीने भर्तीसाठी अर्ज करू शकतो? आणि अर्ज केल्यावर आपले यादीमध्ये नाव कसे पाहू शकतो? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे सोप्या माहितीमध्ये दिली आहे.
आपल्या देशामधील पाण्याची समस्या दूर करण्यासाठी जल जीवन मिशन एक उत्तम उपक्रम आहे. त्याचसोबत गावोगातील नागरिकांना रोजगार प्राप्त होण्यासाठी चांगली संधीसुद्धा आहे. जे कोणी भर्तीसाठी इच्छुक असतील, ते या लेखातून दिलेल्या प्रकिया फॉलो करून अर्ज करू शकतात.
केंद्र व सरकारी योजनांच्या माहितीसाठी वेबसाइटला Subscribe करू शकता किंवा आमच्या Telegram/WhatsApp चॅनेलला जॉईन करू शकता.
FAQs
जल जीवन मिशनला निधी कोण देत आहे?
जल जीवन मिशनसाठी 50% केंद्र व 50% राज्य सरकार मिळून निधी देते.
जल जीवन मिशनचे पाणी कनेक्शन कसे मिळवायचे?
या मिशन अंतर्गत पाण्याचे कनेक्शन मिळविण्यासाठी JJM च्या अधिकृत वेबसाइटमध्ये जावे लागले.
हर-घर-जल योजना काय आहे?
या योजनेच्या माध्यमातून देशभरातील नागरिकांच्या घरामध्ये घरगुती पाण्याचे नळ कनेक्शन बसवून दिले जाते.
पुढे वाचा: