PM Shri Yojana 2024: श्री योजनातून तयार होणार स्मार्ट शाळा, जाणून घ्या संपूर्ण माहिती

PM Shri Yojana 2024: केंद्र सरकारने देशातील विद्यार्थ्यांना स्मार्ट शिक्षा प्रदान करण्यासाठी प्रधानमंत्री श्री योजना सुरु केली. या उपराक्रमाच्या माध्यमातून देशभरातील जुन्या शाळांना नवीन रूप देऊन त्यामध्ये स्मार्ट शिक्षणासाठी उपकरणांचा वापर केला जातो. 

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

आपल्याला माहिती आहे की, प्रत्येक नागरिकांच्या जीवनामध्ये सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी शिक्षण महत्त्वपूर्ण असते. कोणत्याही व्यक्तीला समाजामध्ये काही विकास घडवून आणायचा असेल तर, त्यासाठी त्यानुसार शिक्षण प्राप्त करणे महत्त्वाचे आहे. 

राष्ट्राच्या विकासासाठी हेच सुशिक्षित समाज एक महत्त्वाची भूमिका बजावते. यामध्ये वेगवेगळे समाज एकत्र येऊन एक देश निर्माण करण्यात मदत करतात. यामध्ये प्रत्येक व्यक्तीला चांगले व स्मार्ट शिक्षण प्राप्त करण्यासाठी मदत व्हावी, यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी पीएम श्री योजनाची सुरवात केली. जेणेकरून आपला देश सुशिक्षित होऊन विकास घडवून आणण्यात मदत करेल. 

तर आजच्या या लेखामध्ये आपण या योजने बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. यामध्ये योजना काय आहे? त्यांचे मुख्य उद्देश कोणते आहेत? यामध्ये विद्यार्थ्यांना कोणते फायदे मिळणार? आणि योजनेमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश आहे? हे सगळ आपण या लेखातून बघणार आहोत. 

PM Shri Yojana in Marathi 

भारत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ५ सप्टेंबर, २०२२ रोजी शिक्षण दिन निमित्त पीएम श्री योजनाची घोषणा ट्विटद्वारे केली. PM SHRI Yojana चा पूर्ण अर्थ म्हणजे Pradhan Mantri School for Rising India योजना असा आहे. योजनेच्या अंतर्गत शाळांमध्ये राष्ट्रीय शिक्षा नीती (NEP) लागू करण्यात आली आहे. 

या योजनेच्या माध्यमातून भारतामधील जवळपास १४५०० जुन्या शाळांना नवीन व स्मार्ट शाळेत अपग्रेड करण्याचा ध्येय केंद्र सरकारने ठेवला आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना चांगले व उच्च दर्जाचे शिक्षण प्रदान करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. कारण प्रत्येक विद्यार्थीला आपले विकास करण्यासाठी आणि चांगले मनुष्य घडविण्यासाठी मदत होईल. 

पीएम श्री योजनाचे महत्व

  • केंद्र प्रोयोजित योजना: यामध्ये केंद्र सरकारतर्फे आर्थिक मदत दिली जाणार आणि राज्यकडून लागू करण्यात येणार. यामध्ये ५०:५०, ७०:३० आणि काही डोंगराळ भागात ९०:१० अशाप्रकारे सुद्धा विविध प्रमाण केंद्र व राज्य सरकारकडून कार्यरत केले जाऊ शकते. 
  • स्मार्ट शिक्षा: या योजनेतून विद्यार्थ्यांना आधुनिक, परिवर्तनशील व एकत्रित शिक्षा प्रदान करणे. 
  • रिसर्च शिक्षण: यामध्ये कोणत्याही प्रकारचे रट्टा मारणारे शिक्षण दिले जाणार नाही, याची दख्खल केंद्र शिक्षण कार्यालयाकडून केली जाणार. 
  • फोकस लर्निंग: यामध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्यावर जोर दिले जाणार आहे. 
  • नवीन तंत्रज्ञान: विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी नवीन नवीन तंत्रज्ञानाचे उपयोग केलं जातात. 
  • स्मार्ट वर्ग: प्रत्येक शाळेतील वर्गांमध्ये स्मार्ट उपकरण लावण्यात येते. 
  • खेळांमध्ये विकास: विद्यार्थ्यांना खेळामध्ये चांगल्या प्रकारे आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिले जाते. 

PM Shri Yojana Details 2024

योजनाचे नावप्रधानमंत्री श्री योजना (PM-SHRI)
श्रेणीकेंद्र आयोजित सरकारी योजना
सुरु कधी केलीवर्ष ७ सप्टेंबर, २०२२ रोजी
कोणी सुरु केलीपंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी
विभागशालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय
उद्देशभारतामधील जुन्या शाळांना मॉडर्न रूप प्रदान करणे
लाभार्थी देशभरातील शिक्षण प्राप्त करत असलेले व भविष्यात येणारे विद्यार्थी वर्ग
लाभस्मार्ट व मॉडर्न शिक्षण
अधिकृत वेबसाइटpmshri.education.gov.in

PM Shri Yojana Aim 

प्रधानमंत्री श्री योजनाचे मुख्य उद्देश देशामधील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण प्रणाली उपल्बध करून देणे आहे. जेणेकरून विद्यार्थी चांगल्या प्रकारे शिक्षण प्राप्त करून आपले भविष्य उज्ज्वल करू शकेल. त्याचसोबत समाजाचे विकास घडवून आणण्यात मदत करेल. 

आपल्या भारत देशामध्ये सगळ्यात मोठी समस्या आहे ती म्हणजेच योग्य प्रकारचे शिक्षण मिळणे. देशामधील विविध ठिकाणी भरमसाठ इन्स्टिटूएशन व शाळा आहेत. परंतु त्यामध्ये गुणात्मक शिक्षण दिले जात नाही.फक्त विद्यार्थ्यांना भरती करा आणि पैसे कमवा हेच प्रयोग सगळीकडे चालू आहे. यामुळे विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळत नाही आणि याचा परिणाम त्यांच्या रोजगारावर येतो. 

अश्या समस्यांना दूर करण्यासाठी केंद्र सरकारचे शिक्षण विभागात राष्ट्रीय शिक्षा नीती २०२० मधील उद्देशांना लागू करण्याचे ध्येय ठेवले आहेत. त्याचप्रमाणे विद्यार्थाना फक्त पासआऊट करून पुढे पाठविले जाणार नाही तर गुणात्मक शिक्षण देण्याचा प्रयत्न या योजनेतून राबविण्यात येत आहे. 

यामध्ये विद्यार्थी रट्टा न मारता व्यवस्थितरित्या अभ्यास समजून त्यांचा विकास करता येईल याच्यावर केंद्र सरकारचा जोर आहे. त्याचसोबत एकविसाव्या शतकानुसार प्रामुख्य कौशल्ययुक्त मानवजातीचा निर्माण करणे आणि भारत देशाला सुशिक्षित समाज बनविणे हे धोरण आहेत.

PM Shri Yojana Implementation 

  • प्रधानमंत्री श्री योजना अंतर्गत देशातील शाळांमध्ये राष्ट्रीय शिक्षा नीतीमधील सर्व घटकांना समावेश करून अंमलबजावणी केली जाणार आहे. 
  • या योजनेच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासित प्रदेशातील शाळांना अपग्रेड केले जाणार. ज्यामध्ये १४,५०० जुन्या शाळांना सहभागी करून त्यांचे मॉडर्न रूपात बदल घडवून आणले जाणार. 
  • या योजनेतून जुन्या शाळांच्या शैक्षणिक गुणवत्तेनुसर इतर शाळांना यामाध्यमातून कशाप्रकारे शिक्षणाला पुढे पाठवायचे याची प्रेरणा मिळणार. 
  • केंद्र सरकारतर्फे राबविलेल्या या योजनेतून बदलवून आणलेल्या शाळांपासून आजूबाजूच्या इतर शाळांनासुद्धा आदर्श म्हणून कार्य केले जाणार. 
  • त्याचप्रमाणे केंद्र सरकारतर्फे प्रत्येक राज्यातील आजूबाजूमधील इतर शाळांना मेंटरशीप सुद्धा प्रदान करण्यात येणार आहे. ज्यामुळे त्या इतर शाळेंनासुद्धा शिक्षणामध्ये प्रगती करण्यासाठी मदत मिळेल. 
  • विद्यार्थ्यांना या योजनेच्या माध्यमातून अनुभवात्मक शिक्षण देण्यात येणार जसे लहान मुलांना खेळणीच्या साहाय्याने शिकविले जाणार. यामधून सोप्या पद्धतीने लहान मुलांना शिकायला मिळेल व समजेल. 
  • देशभरातील शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुधार करून चांगले परिणाम आणणे. 

राष्ट्रीय शिक्षा नीती २०२० काय आहे? 

राष्ट्रीय शिक्षा नीतीचे मुख्य उद्देश भारतामधील शिक्षण प्रणालीला विकसित करणे आणि शिक्षणाची गुणवत्ता वाढविणे. त्याचप्रमाणे भारत देशातील संविधानानुसार प्रत्येक नागरिक प्रशिक्षित होऊन समाजात राहणे. भारतीय नागरिकांना व्यवहार, बुद्धी, कार्य व जगात आपल्या देशाबद्दल जागरूकता पसरवणे. 

PM Shri Yojana Benefits 

  • भारत देशामधील शिक्षण वर्ग मजबूत बनविण्यासाठी केंद्र सरकारकडून योजनेच्या माध्यमातून राष्ट्रीय शिक्षा नीती २०२० लागू केली जाणार आहे. 
  • केंद्र सरकारने सुरु केलेल्या प्रधानमंत्री श्री योजनाचे फायदे देशभरातील जुन्या शाळांना होणार. 
  • या योजनेच्यामार्फत जुना शाळांना दुरुस्थ करून त्याचसोबत त्यामध्ये विविध प्रकारचे स्मार्ट शिक्षण पद्धत आणून बदल घडविले जाणार. 
  • केंद्र सरकार राज्य शासनासोबत मिळून एकूण १४५०० जुन्या शाळांना मॉडर्न शाळेत बदलणार. 
  • या नवीन शाळेत मुलांच्या स्मार्ट शिक्षणापासून ते त्यांना भविष्यात प्रगती मिळण्यासाठी विविध प्रकारचे अंमलबजावणी करण्यात येणार. 
  • विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण व भविष्यात रोजगार मिळवून देण्यासाठी कौशल्य परिषदसोबत मिळून काम केले जाणार. 
  • ज्या शाळांना उच्च दर्जाचे शैक्षणिक उपकरणे घेण्यास समस्या होत्या त्यांनाही या योजनेतून ते प्रदान केले जाणार. जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्यांना चांगल्याप्रकारे शिक्षा प्रदान केली जाईल. 

प्रधानमंत्री श्री योजनाचे वैशिष्ट्ये 

  • प्रयोगशाळा: ज्या विद्यार्थ्यांना विज्ञान क्षेत्रात काम करायचे आहे त्यांच्यासाठी प्रयोगशाळा निमार्ण केले जाते. 
  • स्मार्ट क्लासरूम: वर्गामध्ये सर्व विद्यार्थी मुलांना सहजरित्या शिक्षा देण्यासाठी स्मार्ट वर्ग तयार केले जाते. 
  • ग्रंथालय: विद्यार्थ्यांना योग्य प्रकारचे संशोधन करण्यासाठी ग्रंथालय निर्माण करून दिले जाते. 
  • क्रीडा सामग्री: मुलांना क्रीडा क्षेत्रात उच्च पद मिळविण्यासाठी क्रीडांचे उपकरणे उपलब्ध करून दिले जाते. 
  • कला वर्ग: ज्या विद्यार्थ्यांना कला संबंधित क्षेत्रात रुची असेल, त्यांच्यासाठी कला वर्ग बनविले जाते. 
  • आधुनिक सुविधा: विद्यार्थी वर्गाला प्रगतशील बनविण्यासाठी आधुनिक पायाभूत असलेल्या सुविधा उपलब्ध केले जाते. 
  • भारतीयकरण: ज्यामध्ये शाळेत जल संरक्षण, जैविक जीवन शैली, कचऱ्याचा पुनर्वापर, ऊर्जा कार्यक्षम सुविधा आणि  अभ्यासक्रमात ग्रीन शाळा विकास या देशी गोष्टींचा प्रोत्सहन दिले जाते. 

प्रधानमंत्री श्री योजना अंतर्गत महाराष्ट्र राज्यामधील शाळांचे बदल 

केंद्र सरकारने सुरु केलेल्या पीएम श्री योजनेमधून महाराष्ट्रामध्ये असलेल्या ८४६ जुन्या शाळेंना नवीन शाळेत बदल करून आण्यात येणार आहे. ही योजना महाराष्ट्रातील शाळेमध्ये राबविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १४ फेब्रुवारीमध्ये सांगितले आहेत. ज्यामध्ये राज्य सरकारने केंद्र सरकार सोबत मिळून करार केला आहे. यामध्ये केंद्र साकार ४० व राज्य सरकार ६० असा प्रमाण असणार आहे. 

या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये राष्ट्रीय शिक्षा नीती २०२० ही लागू केली जाणार आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रासोबत इतर राज्यांमध्ये एकूण १५०० नवीन शाळा तयार करण्यात येणार आहेत. 

PM Shri Yojana Registration for Schools 

  • प्रधानमंत्री श्री योजना अंतर्गत शाळांना रजिस्टर करण्यासाठी वर्षातून तीन महिन्यातून एकदा वेबसाइट उघडली जाते. 
  • राज्यातील शाळांना सुरुवातीला योजनेच्या अधिकृत वेबसाइटमध्ये भेट द्यावी लागेल. 
  • त्यानंतर वेबसाइटमध्ये जाऊन आपल्या शाळेचे रजिस्ट्रेशन करून घयावे लागेल. 
  • शाळेकडून रजिस्ट्रेशन झाल्यानंतर योजनेच्यामार्फत सरकारी अधिकारी निरीक्षणासाठी पाठविले जाते. 
  • त्यानंतर त्या अधिकाऱ्याकडून शाळेचे रिपोर्ट तयार केले जाते. 
  • रिपोर्ट काढल्यानंतर पुढे सरकारी अधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठविले जाते. 
  • मंजुरी मिळाल्यानंतर शाळेमध्ये बदल घडवून आणले जाते. 

निष्कर्ष 

आम्ही आमच्या लेखातून PM Shri Yojana संदर्भात संपूर्ण माहिती सविस्तारित्या देण्याचा प्रयत्न केला. यामध्ये योजना का सुरु करण्यात आली? कोणासाठी सुरु करण्यात आली? यामधून कोणाचे फायदे होणार? त्यांचे उद्देश काय होते? त्यांचे यामध्ये महत्त्व काय? यामध्ये कोणते विभाग काम करत आहेत? यासाठी कोणती वेबसाइट उघडण्यात आली? यामधून शाळांना व विद्यार्थ्यांना कोणते फायदे मिळणार? या योजनेतून कशा प्रकारे अंमलबजावणी करण्यात येते? योजनेचे वैशिष्ट्ये काय आहेत? महाराष्ट्रामध्ये या योजनेचा इम्पॅक्ट कसा असणार? आणि शाळा कशाप्रकारे रेजिस्ट्रेशन करून लाभ घेऊ शकतात? अशा सर्व गोष्टींबद्दल तुम्हाला लेखामधून मार्गदर्शन करण्यात आले. 

अशाच केंद्र व राज्य सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या माहितीसाठी तुम्ही आम्हाला Subscribe करू शकता किंवा आमच्या Telegram/WhatsApp चॅनेलला फॉलो करून नवीन अपडेट्स मिळवू शकता. 

FAQs

PM श्री योजना काय आहे?

या योजनेच्या माध्यमातून भारत देशामधील जुन्या शाळांना स्मार्ट शाळेत बदलणे. 

महाराष्ट्रात PM श्री च्या किती शाळा आहेत?

महाराष्ट्रामध्ये या योजने अंतर्गत ८४६ शाळांचा समावेश आहेत. 

पीएम श्री योजनेची सुरुवात कधी करण्यात आली? 

या योजनेची सुरुवात वर्ष  वर्ष ७ सप्टेंबर, २०२२ रोजी करण्यात आली होती. 

पुढे वाचा: