Antyodaya Anna Yojana Registration: या आर्टिकलच्या माध्यमातून अंत्योदय अन्न योजनामध्ये अर्ज कसा करायचा? याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला जाणून घेण्यास मदत मिळेल.
केंद्र सरकारने 25 डिसेंबर, 2000 मध्ये अंत्योदय अन्न योजनाची सुरुवात केली होती. या योजनेमध्ये लाभार्थी असलेल्या गरीब नागरिकांना प्रतिमाह 35 किलो धान्य दिले जाते, ज्यामध्ये 2 रुपये किलोने गहू आणि 3 रुपये किलोने तांदूळ देण्यात येते. योजनेमधून अन्न धान्याचा लाभ घेण्यासाठी अर्ज केलेल्या नागरिकांना शिधापत्रिका म्हणजे राशनकार्ड दिले जाते.
तुम्हाला सुद्धा योजनेच्या माध्यमातून अर्ज करून लाभ घ्यायचा आहे, तर लेखामध्ये दिलेल्या अर्जाची प्रकिया स्टेप बाय स्टेप फॉलो करा.
अंत्योदय अन्न योजनाची अर्ज प्रकिया
- योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे.
- ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुमच्या जवळ आवश्यक कागदपत्रे आणि अर्जाचा लेखी पत्र असणे आवश्यक आहे.
- सुरुवातीला तुम्हाला कोरा पांढरा कागद घ्यायचा आहे.
- त्यामध्ये सुरुवातीला तुमच्या क्षेत्राजवळील तहसीलदार कार्यालयाची माहिती भरायची.
- त्यामध्ये तहसीलदारांचे नाव, त्यांचे पोस्ट आणि कार्यालयाचा पत्ता लिहून घ्या.
- त्यानंतर अर्जदार टाकून तुमचे संपूर्ण नाव लिहा.
- त्याच्याखाली तुम्ही राहत असलेल्या ठिकाणाचा संपूर्ण पत्ता द्या.
- पुढे अंत्योदय राशनकार्ड मिळण्याबाबत असा विषय पत्रामध्ये टाका.
- त्याच्याचखाली संदर्भ लिहून शासन निर्णय टाका.
- खाली तहसीलदारांना पत्र लिहिताना तुमची परिस्तिथी सांगा,
- पत्रामध्ये योजने अंतर्गत पात्र असल्याची माहिती द्या.
- त्यानंतर रॅशनकार्डसाठी विनंती करून खाली तुमची सही द्या.
- पुढे ज्या दिवशी नोंदणी करणार आहेत, त्याचे दिनांक टाका.
- तुमचे आधारकार्ड, बँक पासबुक, राशनकार्ड, ओळखप्रमाणपत्र आणि उत्पनाचा दाखला या सर्व कागदांची झेरॉक्स करून पत्रासोबत जोडा.
- तुमचे पत्र व आवश्यक कागदपत्रे घेऊन तहसील कार्यालयात जाऊन जमा करा.
- अर्ज जमा केल्यानंतर तुम्हाला त्यांच्या कडून पोचपावती घेणे आवश्यक आहे.
- तहसीलदार अधिकाऱ्याकडून तुमचे अर्ज तपासले जातील.
- तुम्ही पूर्णपणे पात्र असाल तर योजनेचा लाभ देण्यात येईल
Read More: